देशात काँग्रेसनं ५६ पक्षांबरोबर महाआघाडी स्थापन केली असून आनंद परांजपे हे महाआघाडीचे उमेदवार म्हणून ठाणे लोकसभा लढवत आहेत. काँग्रेसमध्ये नाराजी असल्याची चर्चा असली तरी अशा कोणत्याही प्रकारची नाराजी नसून कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकणारच असा विश्वास काँग्रेस नेते खासदार हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला.