ठाणे पूर्वतील गणसिध्दी मित्रमंडळानं अनोख्या पध्दतीनं गणपती विसर्जन केलं.
Ganeshotsav
ठाण्यामध्ये ७५० सार्वजनिक तर ३१ हजार ७१६ घरगुती गणपतींचं भावपूर्ण वातावरणात विसर्जन
गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हांला, गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात ठाण्यामध्ये भावपूर्ण वातावरणात विघ्नहर्त्या श्री गणेशाला निरोप देण्यात आला.
कृत्रिम तलावातील शुध्द पाण्यातच गणेश विसर्जन करणं योग्य – दा. कृ. सोमण
कृत्रिम तलावात गणेश विसर्जन करण्यास विरोध होत असला तरी प्रदूषित पाण्यापेक्षा कृत्रिम तलावातील शुध्द पाण्यातच गणेश विसर्जन करणं योग्य होईल असं मत पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी व्यक्त केलं आहे.
उल्हासनगरमध्ये आंबवणे कुटुंबियांच्या घरी गेल्या २० वर्षांपासून पर्यावरण स्नेही गणेशोत्सव
सण उत्सव म्हणजे घरातलं चैतन्य. यानिमित्तानं एकमेकांकडे जाणं येणं होतं. भेट होते. पण ही भेट केवळ अवांतर गप्पात सिमित न राहता ती समाज बदलाचं माध्यम ठरावं या विचारानं प्रेरीत होऊन एका लहानशा कुटुंबानं गेल्या २० वर्षापासून पर्यावरण स्नेही गणेशोत्सवाचा अवलंब केला आहे.
गणेशोत्सवातील सजावटीमध्येही समूह विकास योजनेचं प्रतिबिंब
ठाण्यामध्ये समूह विकास योजना वादग्रस्त ठरली असताना गणेशोत्सवातील सजावटीमध्येही समूह विकास योजनेचं प्रतिबिंब उमटलं आहे.
पुढच्या वर्षी गणरायाचं आगमन ११ दिवस लवकर
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ही गणेश भक्तांची हाक गणरायानं ऐकली असून पुढच्या वर्षी गणरायाचं आगमन हे ११ दिवस आधी होणार आहे.