पु.लंनी मध्यमवर्गाची कधी खिल्ली उडवली नाही किंवा तेजोभंगही केला नाही – अंबरिश मिश्र

दुस-या महायुध्दानंतर घडलेल्या सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नयनाने मध्यमवर्ग उदयाला आला. या मध्यम वर्गाचे पु. ल. देशपांडेंनी मातेप्रमाणे सिंचन, संगोपन करून त्यांच्यावर वैचारीक संस्कार केले. या संस्कारासाठी त्यांनी विनोदाचा आधार घेतला. पण असे करताना पु.लंनी मध्यमवर्गाची कधी खिल्ली उडवली नाही किंवा तेजोभंगही केला नाही असे अभ्यासपूर्ण प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार अंबरिश मिश्र यांनी ठाण्यात बोलताना केलं.

Read more