ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना आणि काँग्रेसमध्ये थेट लढत होईल असा दावा काँग्रेसचे उमेदवार विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. गेल्या निवडणुकीत या मतदारसंघात शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांचा अगदी थोडक्या मतांनी विजय झाला होता. ठाण्यामध्ये शिवसेना समूह विकास योजनेच्या नावावर भ्रम निर्माण करत आहे. समूह विकास योजनेचं काम ज्या गतीनं सुरू आहे ते पाहता ही योजना पूर्ण व्हायला दशकं लागतील असं चव्हाण यांनी सांगितलं. मेट्रोमुळं ठाण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही. यासाठी घोडबंदर रस्त्याला समांतर रस्ता बनवण्याची गरज विक्रांत चव्हाण यांनी व्यक्त केली.