आनंदीबाई केशव जोशी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. बाल राधा-कृष्णांमुळे पूर्व प्राथमिक विभागाला वृंदावनाचे रूप प्राप्त झाले होते. सामुहिक प्रार्थनेनंतर मुलांना गोकुळाष्टमी आणि दहीहंडीची माहिती देण्यात आली. तसंच दहीहंडी फोडताना पाण्याचा गैरवापर टाळण्याचा संदेश देण्यात आला. शिक्षकांच्या मदतीनं मुलांनी मानवी मनोरा रचून दहीहंडी फोडली. नंतर मुलांना दहीकाल्याचा प्रसाद देण्यात आला. महाराष्ट्रात आलेल्या नैसर्गिक आपत्तीचं भान ठेवून केवळ मुलांच्या माहितीसाठी हा उत्सव पर्यावरणपूरक, ध्वनी प्रदूषणमुक्त वातावरणात साजरा करण्यात आला.