ठाणे लोकसभा मतदारसंघात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमी मतदान

जिल्ह्यामध्ये मतदानाचा टक्का वाढीसाठी प्रयत्न होऊनही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदानाचा टक्का घटला आहे. जिल्ह्यामध्ये काल ठाणे, कल्याण, भिवंडी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालं. हे मतदान तुलनेनं कमी झाल्याचंच दिसून आलं. ठाणे लोकसभा मतदारसंघात अवघं ४९.२३ टक्के मतदान झालं आहे. ठाणे लोकसभेमध्ये मीरा-भाईंदर, ओवळा-माजिवडा, कोपरी-पांचपाखाडी, ठाणे, ऐरोली आणि बेलापूर असे विधानसभेचे ६ मतदारसंघ येतात. यामध्ये ठाणे विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ५७.९० टक्के तर सर्वात कमी म्हणजे ४३. ४८ टक्के मतदान ऐरोली विधानसभा मतदारसंघात झालं आहे. ओवळा-माजिवडा विधानसभा मतदारसंघात ४७.५२ टक्के, मीरा-भाईंदरमध्ये ४९.०८ टक्के, कोपरी-पांचपाखाडीमध्ये ५१.१५ टक्के तर बेलापूरमध्ये ४८.८३ टक्के मतदान झालं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading