ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांना सन्मान

लोकशाहीमध्ये निवडणुका महत्वपूर्ण असून मतदार हा गाभा आहे. यात  मतदाराचे मत मोलाचे आहे.  प्रत्येक मतदाराचे मत किती महत्वाचे आहे, हे अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा केला जातो, असे प्रतिपादन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव श्रीकांत देशपांडे यांनी केले. यावेळी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त  निवडणूक कार्यात योगदान देणाऱ्याचा विशेष सत्कार करण्यात आला. निवडणूक कार्यात राज्यातील अधिकारी वर्गाचे योगदान लक्षात घेऊन त्यांना पुरस्कार देण्यात आले. यात उत्कृष्ट कामगिरी करणारे ठाणे जिल्हा निवडणूक अधिकारी  अशोक शिनगारे यांना सन्मानित करण्यात  आले. उत्कृष्ट कामगिरी करणारे ठाणे उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना कदम यांना सन्मानित करण्यात  आले. सध्याचे युग हे समाजमाध्यमांचे असल्याने समाजमाध्यमावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या निवडणूक कार्यालयाचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने घेतलेल्या विविध स्पर्धाचे बक्षीस वितरणही यावेळी करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यात लोकशाही दिंडी, पथनाट्य, रांगोळी प्रदर्शन, मतदार जागृती दालन, ध्वनीचित्रफितीचे सादरीकरण, शपथ घेणे, ओळखपत्राचे वाटप, अहवाल प्रकाशन आदी करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading