ठाण्यामध्ये काल आणि आज पावसानं हजेरी लावल्यामुळे सर्वसामान्यांची तारांबळ उडाली. काल संध्याकाळी अचानक पावसानं हजेरी लावली. यामुळं खरेदीसाठी बाहेर पडलेल्या ठाणेकरांची तारांबळ उडाली. पावसानं हजेरी लावल्यामुळं तापमानात काहीशी वाढ झाली आहे. आजही दुपारनंतर पावसानं काही भागात जोरदार हजेरी लावली. दुपारी अडीचच्या सुमारास सुरूवातीस ढगाळ वातावरण निर्माण झालं. त्यानंतर काही वेळ जोरदार सरी पडल्या. ऊन-पावसाच्या या खेळामुळे अनेकांना तब्येतीच्या तक्रारी चालू झाल्या आहेत. सर्दी, घसा खवखवणे अशा तक्रारींमध्ये वाढ झाल्याचं दिसत आहे.