२७ वर्षांनी दिवाळी अमावास्येला सूर्यग्रहण – दा कृ सोमण

आज खंडग्रास सूर्यग्रहण असून आज २७ वर्षांनी दिवाळी अमावास्येच्या दिवशी सूर्यग्रहण दिसणार असल्याचं पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी सांगितलं. २७ वर्षापूर्वी २३ ऑक्टोबर १९९५ ला खग्रास सूर्यग्रहण झालं होतं आणि ते भारतातून दिसलं होतं. हे आजचं खंडग्रास सूर्यग्रहण आहे ते संध्याकाळी ४ वाजून ४९ मिनिटांनी सुरू होणार आहे. ग्रहणमध्य संध्याकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी आहे त्यावेळी ३६ टक्के सूर्यबिंब हे चंद्रबिंबामुळे झाकलं जाणार आहे. आणि ग्रहणातच संध्याकाळी ६ वाजून ८ मिनिटांनी सूर्यास्त होणार आहे. हे ग्रहण खूप महत्वाचं असून यावर्षातील अखेरचं हे ग्रहण आहे. तसंच सूर्यास्ताच्यावेळी हे ग्रहण होणार असल्याने छायाचित्रकारांनाही एक पर्वणीच आहे. कारण ग्रहणातच सूर्याचा अस्त होणार असल्याचंही सोमण यांनी सांगितलं. हे सूर्यग्रहण अवश्य पहा कारण यानंतर पुन्हा १० वर्षांनी असा सूर्यग्रहणाचा योग असून ते उत्तर भारतातून दिसणार असल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र हे ग्रहण साध्या डोळ्यांनी पाहू नये. ग्रहण चष्म्याचा वापर करावा किंवा चाळणीवर पांढरा कागद लावून हे ग्रहण पहावे असंही दा कृ सोमण यांनी सांगितलं.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading