स्वच्छता दर्पणमध्ये ठाणे जिल्ह्याला अव्वल क्रमांक

स्वच्छता दर्पण कार्यक्रमांतर्गत ठाणे जिल्ह्याला अव्वल क्रमांक मिळाला असून देशात ठाणे जिल्ह्याला १२५वा क्रमांक मिळाला आहे. जिल्ह्याचा ग्रामीण भाग स्वच्छ, सुंदर रहावा यासाठी जिल्हा परिषद, स्वच्छता आणि पाणी पुरवठा विभाग दरवर्षी विविध उपक्रम हाती घेते. तसंच केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छतेबाबतच्या सर्व योजना जलद गतीने राबवत असते. त्यामुळेच यंदा पेयजल स्वच्छता मंत्रालयातर्फे आयोजित स्वच्छता दर्पण मूल्यांकनात ठाणे जिल्हा अव्वल ठरला आहे तर देशामध्ये १२५वा क्रमांक मिळाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading