ठाण्यातील सुपरमॅक्स कंपनीतील कर्मचा-यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. सुपरमॅक्स कंपनीत काम करणाऱ्या दोन हजार कर्मचाऱ्यांना एक वर्षापासून पगार होत नाही, कर्मचाऱ्यांनी हा मुद्दा घेऊन मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. बंद असलेली कंपनी पुन्हा सुरू करण्यात यावी आणि कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत करण्यात यावे यासाठी शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटी साठी गेले होते. मुख्यमंत्र्यांनी लवकरच कामगारांच्या प्रश्नाबाबत तोडगा काढण्याचे आश्वासन दिले आहे. कंपनीला उत्पादन करण्यात काहीच रस असल्याचं दिसत नाही. त्यामुळं निदान कर्मचा-यांची देणी तरी एकदा द्यावीत अशी कर्मचा-यांची मागणी होती. याबाबत लवकर तोडगा काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी कामगारांना दिलं आहे.