एनआरसी आणि सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या प्रतींची राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे होळी करण्यात आली. मोदी-शहा हे हिटलरच्या वाटेवर असल्याचा आरोप करत हिटलरच्याही प्रतिमेचं दहन करण्यात आलं. देशानं बुध्द आणि गांधी यांची अहिंसा आणि शांतता स्वीकारली आहे. देश आणि हिंसा ही मूल्य भारतानं कधीच स्वीकारली नाहीत. त्यामुळेच भारत प्रगतीकडे वाटचाल करू शकला तर पाकिस्तान रसातळाला गेला. भारत हा बुध्द आणि गांधींचा देश आहे तो कधीच गोळवलकरांचा होणार नाही अशी टीका यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली. या विधेयकामुळे देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच धर्माच्या आधारे नागरिकत्व ठरवण्यात येणार आहे. त्याचा निषेध ईशान्येकडील राज्यांमध्ये केला जात असतानाच उत्तर दक्षिण भारतामधले पहिले आंदोलन ठाण्यात झाले. मोदी सरकार मुर्दाबाद, धर्मांध सरकार हाय हाय अशा घोषणा देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार निदर्शनं केली.