गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सव मंडळांनाही महापालिकेनं संपूर्ण भाडं माफ केलं आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाना संपूर्णत: भाडेमाफ करावे अशी मागणी शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती. गेली दोन वर्षे कोरोनाचा काळ असल्यामुळे बहुतांशी सार्वजनिक मंडळे आर्थिक विवंचनेत आहेत. या मंडळांना दिलासा मिळावा या दृष्टीकोनातून सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना संपूर्ण भाडे माफी द्यावी असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. या निर्णयामुळे सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळांना देखील दिलासा मिळणार आहे. सर्व मंडळांनी महापालिकेने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन नवरात्रौत्सव साजरा करावा असे आवाहन नरेश म्हस्के यांनी केले आहे.