१० वर्षानंतर समाज एका व्यक्तीला मानत नाही हे समाजाचं सूत्र आहे पण साडेसातशे वर्ष उलटूनही ज्ञानोबा आणि तुकाराम महाराजांची ही विचार परंपरा महाराष्ट्रात टिकून आहे असं मत हरिभक्त परायण प्रकाश बोधले महाराज यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केलं. रामभाऊ म्हाळगी समिती व्याख्यानमालेत ते बोलत होते. संतांनी नेहमी समतेचा विचार मांडला. स्त्री ही पुरूषापेक्षा उच्च वाटू नये म्हणून जुन्या काळात दक्षता घेतली जाई. परंतु ज्या देशात स्त्री विकासाच्या प्रवाहात नाही तो देश कधीच प्रगतीच्या वाटेनं जाऊ शकत नाही हा मूलमंत्र संतांनी लक्षात घेतला होता. आजच्या काळात धर्म ही अफूची गोळी आहे. पुण्य भूलथाप आहे तर पाप ही धमकी आहे. अशाप्रकारच्या विचाराला पुरोगामी समजून प्रगत समाज व्यवस्थेत गेलो आहे. अशी मंडळी दिसत असल्यामुळेच साडेसातशे वर्ष उलटूनही ज्ञानोबा-तुकाराम महाराजांची विचार परंपरा महाराष्ट्रात टिकून असल्याचं प्रकाश बोधले महाराज यांनी सांगितलं.