सरकारला ओबीसीतून आरक्षण द्यावेच लागेल – मनोज जरांगे पाटील.

सरकारला ओबीसीतून आरक्षण द्यावेच लागेल असं मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं. काल ठाण्यामध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. आम्ही अंतरवालीला जाण्याआधी सरकारने आरक्षण द्यावे असेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केल. आम्ही शांततेचं आवाहन करत असतानाच आमच्यावरच गुन्हे दाखल केले जात आहेत, कितीही खोटे गुन्हे दाखल केले तरी माघार घेणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला. भुजबळां विषयी बोलताना जरांगे पाटील यांनी सांगितलं की त्यांना समज द्यावी की नाही हा सरकारचा निर्णय आहे. आम्ही कोणाच्याही हक्काच आरक्षण मागत नसून आमच्या स्वतःचा हक्काचं आरक्षण मागत आहोत. पण आमच्याकडे मात्र दुर्लक्ष करत आहे असं जरांगे पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading