संसदेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हे पूर्णपणे चुकीचं असल्याचं मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. मुख्यमंत्री दोन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत. आज ते नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहून राज्याचे मुद्दे या बैठकीत मांडणार आहेत. आज या बैठकीला निघण्यापूर्वी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न या बैठकीत प्रामुख्याने मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच संसदेच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकणे हे पूर्णपणे चुकीचे असून यापूर्वी देखील राज्यपालांना डावळून अनेक राज्यामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी तसेच काँग्रेसच्या पूर्व पंतप्रधानांच्या हस्ते ग्रंथालयाच्या इमारतींचे उद्घाटन झालेली आहेत. फक्त मोदींना विरोध करायचा म्हणून या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकण्यात येत आहे. ते सर्वस्वी चुकीचे आहे, असे मत एकनाथ शिंदे त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.