ठाण्यात तब्बल तीन हजाराहून अधिक वाहने जप्त करण्यात आली.आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करत विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 696 वाहन चालकांवर काल दिवसभरात ठाणे ग्रामीण पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून 2 लाख 70 हजार 400 रुपये इतका दंड वसूल केला आहे. तर ठाणे शहर पोलिसांनीह लॉकडाऊन कालावधीत तब्बल 2 हजार 570 दुचाकी, चारचाकी वाहने जप्त केली आहेत. लॉकडाऊनमुळे कुणीही संचारबंदी कायदयाचे उल्लघन करू नये यासाठी ग्रामिण पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमा बंद करून महामार्गावर नाकाबंदी केली आहे. संचारबंदी लागु झाल्यापासुन आतापर्यंत ग्रामिण पोलिसांनी परराज्यात पलायन करणाऱ्या एकूण 800 हुन अधिक जणांना पकडले असुन त्यांची वाहने जप्त केली आहेत. तर,आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच, संचारबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या 600 हुन अधिक जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत अशी माहिती पोलिस अधिक्षक कार्यालयाकडून देण्यात आली. तर गेल्या दोन दिवसात संचारबंदीचे उलंघन केल्याप्रकरणी एकुण 18 आरोपीविरुद्ध 6 गुन्हे दाखल करण्यात आले असून 8 वाहने जप्त करण्यात आली आहेत.