शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा शुक्रवारी २४ तास बंद राहणार आहे. नौपाडा कोपरी प्रभाग समिती अंतर्गत कोपरी क्षेत्रातील असलेल्या धोबीघाट जलकुंभाची ३०० मीमी व्यासाची मुख्य वितरण जलवाहिनी, साईतीर्थ टॉवर येथे आणि बारा बंगला सर्कल येथील धनेश्वर मंदिर येथे सॅटीस प्रकल्पाचे कामांतर्गत बाधीत होत असल्याने, स्थलांतरीत करणे आवश्यक आहे. हे काम अत्यंत तातडीचे असल्याने शुक्रवारी सकाळी ९ वाजल्यापासून शनिवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २४ तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यामुळे ठाणे पुर्वेकडील संपुर्ण कोपरी परिसरातील सिध्दार्थ नगर, शांतीनगर, चेंदणी कोळीवाडा, साईनगरी, साईनाथ नगर मस्ताननगर, ठाणेकर वाडी, कोपरी गाव, धोबीघाट, नातु परांजपे कॉलनी, स्टेशन परिसर, आदर्शनगर, सुदर्शन कॉलनी, आनंदनगर, गांधीनगर, कानेवाडी, सिध्दीविनायक नगर, केदारेश्वर नगर तसेच नवजीवन सोसायटी परिसर आदी परिसराचा पाणी पुरवठा वरील कालावधीत पुर्णपणे बंद राहणार आहे. पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.