विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांची सैन्यदलाचे हात बांधून ठेवल्याबद्दल मनमोहनसिंग सरकारवर जोरदार टीका

विश्व हिंदू परिषदेचे कार्यकारी अध्यक्ष अलोक कुमार यांनी सैन्यदलाचे हात बांधून ठेवल्याबद्दल मनमोहनसिंग सरकारवर जोरदार टीका केली. ठाण्यामध्ये श्रद्धेय अशोक सिंघल स्मृती पुरस्कार देऊन ज्येष्ठ हिंदुत्ववादी कार्यकर्ते सच्चिदानंद शेवडे यांचा गौरव करण्यात आला. त्यावेळी बोलताना अलोक कुमार यांनी ही टीका केली. 1971 नंतर भारतीय वायू दलाने कधीही सीमा पार केली नव्हती. वायुदलाने सीमारेषां जवळ असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला करून यांना नियंत्रित करण्याचे आदेश देण्यात आले होते. राम मंदिर उभारणीसाठी चळवळ निर्माण करण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. त्यांच्या या चळवळीमुळे लाखो लोक प्रभावित झाले होते असे आलोक कुमार यांनी सांगितले. विश्व हिंदू परिषदेच्या स्वयंसेवकांना पूर्वी कोणत्या सोयी सुविधा मिळत नसत मात्र आताच्या स्वयंसेवकांना काही सोयी सुविधा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. अशोक सिंघल यांनी दिलेल्या योगदानाला तोड नसल्याचंही अलोक कुमार यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading