स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी राज्यातील एक हजाराहून अधिक विद्यार्थी ,कलाकार आणि नाट्यनिर्माते राज्याच्या छत्तीस जिल्हयांत एकाच दिवशी ७५ महाविद्यालये, ७५ ठिकाणी, ७५ नाट्यप्रयोग सादर करत होती. या अनोख्या प्रकल्पात जिल्ह्यामधून विद्या प्रसारक मंडळाच्या पॉलिटेक्निकची निवड झाली होती. या महाविद्यालयातील ५ विभागाच्या विद्यार्थ्यांनी या नाटकात सहभाग
घेतला होता. त्यांनी आझाद हिंद ची गाथा हे नाटय सादर केले.
या एका नाटकापासून प्रेरित होऊन युवाविद्यार्थी पुन्हा आपल्या दैदिप्य-मान ईतिहासाकडे वळते असा उद्देश होता. या नाटकात सहभागी झालेल्या सर्व कलावंतांचे विद्या प्रसारक मंडळाचे तन्त्रनिकेतना चे प्राचार्य डॉ डी के नायक यानी विशेष कौतुक केले.
या सर्व कार्यक्रमाचे दिग्दर्शन आणि नियोजन इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख डॉ किर्ती आगाशे यांनी प्राध्यापक गौतमी पुजारे, पूजा जांभळे आणि सुगिनिमा एम. या आपल्या सहकारी प्राध्यापक वर्गाला घेवून केले. या निमित्ताने एक प्रभातफेरी महाविद्यालय आवारात काढण्यात आली होती.