सध्या तापमानाचा पारा वाढला असून याचा फटका आंब्यालाही बसला आहे. वाढत्या तापमानामुळे आंब्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात कोकणातील हापूस आंब्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली असून, दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याचे चित्र आहे. वाढलेल्या तापमानामुळे ग्राहकांनी आंबा खरेदीकडे पाठ फिरवली आहे. बाजारात ग्राहकच नसल्याने दरात मोठी घसरण झाली असून तीन हजार रुपयांची पेटी एक हजार रुपयांवर आल्याने व्यापारी संकटात सापडला आहे. पुढील काळात तापमान कमी झाल्यास काही परिणाम होईल मात्र दिवसाला जवळपास सव्वा लाख पेट्यांची आवक होऊनही आंबे विक्री होत नसल्याने मोठे नुकसान सोसावे लागत असल्याचे व्यापारी सांगत आहेत..