वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या खेळकुद स्पर्धेचा समारोप आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राष्ट्रिय खेळाडू कविता राऊत उपस्थित होत्या. आदिवासी विकास तर्फे क्रीडा प्रबोधिनीची स्थापना करण्यात येणार आहे. यामध्ये पाचवी पासून पदवीधर पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. शिक्षणा बरोबर क्रीडा क्षेत्रात ही त्यांची उन्नती व्हावी क्रीडा प्रबोधिनितील विद्यार्थी पहिल्या पाच वर्षात राज्य पातळी वरती आणि पुढील पाच वर्षात देश पातळीवर या मुलांनी खेळावे असा मानस असल्याचं विजयकुमार गावित यांनी सांगितले.