रेमण्ड कंपनी विरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे न्यायाची मागणी

ठाण्यात रेमण्ड कंपनीच्या हद्दीत असलेली मौजे पाचपाखाडी येथील सर्व्हे नं. 127 क्षेत्र 0-86-0, सर्व्हे नं. 128/ब क्षेत्र 1-81-1 आणि सर्व्हे नं. 129/1 क्षेत्र 2-09-2 या जमिनीचे सन 1930-31 च्या सातबारा उतार्‍यावर वारस हक्काने आदिवासी कुळाच्या नावावर असताना ही जमिन बेकायदेशीररित्या बळकावून गगनचुंबी इमारतींचे इमले बांधणार्‍या रेमण्ड कंपनी विरोधात जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संघटनेचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. ठाण्यातील शासकीय निवासस्थान येथे या जमिनीचे मालक आदिवासी बांधवांना सोबत घेवून पत्रकार परिषदेत जिल्हाधिकार्‍यांकडे न्यायाची मागणी करण्यात आली. यावेळी आदिवासी शेतकरी सुरेश भुयाळ आणि गणपत बोडके यांचे संपूर्ण कुटूंब उपस्थित होते.

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading