रस्त्यावरील बालकांसाठी फिरते पथकासाठी स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

रस्त्यावरील मुलांना काळजी आणि संरक्षणाची गरज असून त्यांना शिक्षणाच्या आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासनातर्फे फिरती पथक हा पथदर्शी पथक राबविण्यात येणार आहेत. जिल्ह्यात हा प्रकल्प राबविण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. संस्थांनी सात दिवसाच्या आत जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयात प्रस्ताव पाठवावे असे आवाहन जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी केले आहे. नाविन्यपूर्ण कार्यक्रमाअंतर्गत ठाण्यासह नाशिक, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि नागपूर या 6 जिल्ह्यांमध्ये 6 महिन्यांकरिता प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येणार आहे. या प्रकल्पास केंद्र शासनाकडून निधी प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाचा खर्च बाल न्याय निधीमधून भागवण्यात येणार आहे. फिरती पथक राबविण्यासाठी शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे सर्व अटी शर्थीचे पालन चालविण्यास उत्सुक असलेल्या आणि 25 आसनी बस/व्हॅन, वाहन चालक, समुपदेशक, काळजीवाहक, शिक्षक हे कर्मचारी, बस/व्हॅन मधील मुलांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असलेल्या स्वयंसेवी संस्थांनी प्रस्ताव सात दिवसाच्या आत जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी कार्यालयात सादर करावेत असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading