रत्नागिरीच्या स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाच्या माध्यमातून श्रीमद् अभंग ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन करण्यात आलं आहे. पाचपाखाडीतील ज्ञानेश्वर मंदिर येथे २२ ते २८ फेब्रुवारी दरम्यान रोज दुपारी २ ते ६ या वेळेत हे पारायण होणार आहे. सव्वासातशे वर्षापूर्वी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या श्री ज्ञानेश्वरी या ग्रंथाची त्याकाळची प्राकृत भाषा आज समजणं अवघड झालं आहे. रत्नागिरीतील पावस येथील साक्षात्कारी संत स्वामी स्वरूपानंद महाराजांनी ही गोष्ट लक्षात घेऊन या मूळ ग्रंथाचा समजण्यास सोपा असा मराठी भाषेत ओवीबध्द अनुवाद केला आहे. पारायणासाठी इच्छुक साधकांनी ७६६६४ ३९३१५ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.