येऊर येथे पोहण्यासाठी गेले असताना एका १६ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कोर्टनाका येथे राहणारा प्रसाद पावसकर हा मुलगा सकाळी ७ वाजताच्या सुमारास आपल्या ६ मित्रांबरोबर पाटोनपाडा येथील नील तलावात पोहण्यासाठी गेला होता. प्रसादने पाण्यात उडी घेतली असता तलावामधील दगडावर डोके आपटून मार लागला, त्याला एका मित्राने बाहेर काढले परंतु चक्कर आल्याने तो पुन्हा पाण्यात पडला आणि तलावामधील दगडात फसल्याने पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ठाणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, वागळे इस्टेट अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि वर्तकनगर पोलीसांनी तातडीनं घटास्थळी धावा घेऊन मृतदेहाला बाहेर काढले आणि छत्रपती शिवाजी महाराज रूग्णालयात पाठवण्यात आले.