मुबंई सेंट्रलच नामकरण नामकरण नाना शंकरशेठ मुंबई टर्मिनस असं करावं या मागणीसाठी ठाणे रेल्वे स्थानकात निदर्शनं करण्यात आली. नाना शंकरशेठ यांच्या प्रयत्नांमुळेच देशात रेल्वे सेवा सुरू होऊ शकली. अशा नाना शंकरशेठ यांचं नाव मुंबई रेल्वे स्थानकाला द्यावं अशी ब-याच वर्षापासूनची मागणी आहे. मात्र रेल्वे प्रशासनानं कायम याकडे दुर्लक्ष केलं आहे. आज रेल्वेचा वर्धापन दिन साजरा होत असताना रेल्वे प्रशासनाला याची आठवण करून देण्यासाठी ही निदर्शनं करण्यात आली. नामदार जगन्नाथ शंकरशेठ प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय दैवज्ञ समाज उन्नती परिषद यांच्यातर्फे ही निदर्शनं करण्यात आली.