फणस जरी वरून काटेरी असला तरी, आतुन गोड असतो.तशीच आमची ही कोकणातील माणसे आहेत असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. कोकण ग्रामविकास मंडळाच्या वतीने सीताराम राणे यांनी ठाण्यातील शिवाई नगर येथील मालवणी महोत्सवाचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण स्वतः तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटीबद्ध असल्याचे त्यांनिी सांगितले. त्याचबरोबर बिकट बनलेला मुंबई – गोवा महामार्ग लवकरच मुंबई-पुणे एक्सप्रेस वे तसेच, समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर ग्रीनफिल्ड अॅक्सेस कंट्रोल असा रस्ता बनवणार असुन सिंधुदुर्गातील कोस्टल रस्त्याचेही रुंदीकरण करणार असल्याचे जाहीर वचन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.