मांनकोली उड्डाण पुलाचं काम शेवटच्या टप्प्यात असुन एप्रिल पर्यंत हा पुल वाहतुकीसाठी खुला होईल अशी माहीती शिव सेनेचे युवा नेते दिपक म्हात्रे यांनी दिली. मध्यमवर्गीयांचे सुरक्षित वास्तव्याचे ठिकाण म्हणून डोंबिवली शहराला मोठ्या प्रमाणावर पसंती दिले जात आल्याने, या शहराचे नागरिकरण झपाट्याने होत आहे. डोंबिवली शहरात प्रत्येक घरा मागे सरासरी दोन ते तीन दुचाकी आणि चारचाकी वाहने असल्याने पर्यायाने वाहतुकीसाठी रस्ते अपुरे पडत असून वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. डोंबिवली शहरातील नागरिकांना आपल्या वाहनाने ठाणे मुंबई ,नवी मुंबई आणि पनवेलला जाण्यासाठी शिळफाटा आणि कल्याणहून भिवंडी मार्गे ये जा करावे लागत असल्याने या रस्त्यावरील वाहनाच्या लांबच लांब रांगांच्या वाहतूक कोंडीतून तासंतास खोळंबून राहावे लागत आहे. डोंबिवली शहरातून ठाणे मुंबईकडे जाण्यासाठी जोड रस्त्यांचे जाळे विणण्यासाठी कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने आणि शासनाच्या एमएमआरडीए च्या माध्यमातून मोठा गाव ते कोपर रस्त्यासाठी १८ कोटी, मोठा गाव ठाकूर्ली ते दुर्गाडी या रिंग रोडच्या तिसऱ्या टप्प्याकरीता ५७० कोटीची निविदा मंजूर केली आहे. रेल्वे फाटकाच्या पुलाचे काम सुरु झाले आहे. सध्या या पूलाचे काम ८४ टक्के पूर्ण झाले आहे. मोठा गाव ते मांनकोली या टप्प्यातीलं शेवटच्या एक्सपांन्श काम सुरु आहे. लवकरच खासदार श्रीकांत शिंदे याची पाहणी करतीलं. त्यानंतर हा पूल वाहतूकीसाठी येत्या एप्रिल महिन्यापासून खुला केला जाईल अशी माहिती दीपेश म्हात्रे यांनी दिली.