यावर्षी मकर संक्रांतीचा पुण्यकाल रविवारी सकाळी सूर्योदयापासून सायंकाळी सूर्यास्तापर्यंत आहे. अशी माहिती पंचांगकर्ते दा कृ सोमण यांनी दिली. याविषयी अधिक माहिती देताना सोमण यांनी सांगितलं की, या काळात कठोर बोलू नये. वादविवाद करू नयेत. कुणालाही वाईट शब्द बोलू नयेत. झाडे तोडू नयेत. गवत कापू नये. कामविषय करू नयेत. या पुण्यकालात भांडे, गाईला घास, तीळ भरलेले सुगड, लोकरीचे वस्त्र, तूप, कपडे दान द्यावे. या आधुनिक काळात विद्यादान, श्रमदान, ग्रंथदान, रक्तदान , सामाजिक-शैक्षणिक संस्थाना अर्थदान द्यावे. या पुण्यकालात समाजकार्य करावे. इतराना तीळगूळ द्यावा. असे शास्त्रात सांगितले आहे.