कालपासून भातसा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार चालू असून, भातासा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी 1.25 मिटर गेट उघडून पाणी सोडण्यात येत आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासोबताच, सापगाव पूल बुडणार नाही अश्या पद्धतीने पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येत आहे.
मात्र, अजून पावसाचा जोर वाढल्यास धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढवावा लागेल. तरी सापगाव पुलावरून पाणी जाण्याची परिस्थिती येण्याची शक्यता पाहून, प्रशासनाच्या वतीने सतर्कतेच्या सूचना देण्यात आली आहे.