जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली असून जून महिना संपत आला तरी अजून पावसाने म्हणावी तशी हजेरी लावलेली नाही. पावसानं दडी मारल्यामुळे पाणी टंचाईची भीती निर्माण झाली आहे. आता पावसानं हजेरी न लावल्यास पाणी कपातीला सामोरं जावं लागण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या २४ तास ठाण्यात २४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आत्तापर्यंत अवघा १६४ मिलीमीटर पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी हाच पाऊस १ हजार ४२ मिलीमीटर इतका झाला होता.