पावसानं गेल्यावर्षीच्या पावसाची सरासरी आज सकाळी ओलांडली आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर काही दिवस पाऊस झाला मात्र त्यानंतर पाऊस गायब झाल्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. पण गेल्या काही दिवसात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आज सकाळी पावसानं गेल्यावर्षीच्या पावसाची सरासरी ओलांडली आहे. गेल्यावर्षी ३ हजार ७६ मिलीमीटर पाऊस झाला होता. तर आज सकाळपर्यंत ३ हजार ९७ मिलीमीटर पाऊस झाला असून पावसानं ही सरासरी ओलांडली आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणारी भातसा आणि बारवी ही धरणंही भरून वाहत असून या धरणांमधून पाण्याचा विसर्गही सुरू झाला आहे. पाऊस जोरदार झाल्यामुळे यंदा पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर झाली असून आता पाणी कपात करावी लागणार नाही.