पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांचं आवाहन

जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा देत नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. राज्यात पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. एकल वापर प्लास्टिक वापर टाळणे, झाडाचे संगोपन करणे, मोठ्या आवाजाचे, प्रदुर्षण करणारे फटाके टाळून पर्यावरण पूरक दिवाळी साजरी करावी. पर्यावरणपोषण वातावरणात नागरिकांचे आरोग्य जोपासण्यासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम या दिवाळीपासून सुरू करूयात असे आवाहन शंभुराज देसाई यांनी केले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading