ठाण्यातील कोळी बांधवांनी कळवा येथील खाडीकिनारी जाऊन समुद्राला नारळ अर्पण करून पारंपरिक पध्दतीने नारळी पौर्णिमा साजरी केली. कोळी बांधवांनी खाडीकिनारी जाऊन सागराविषयीची आपली कृतज्ञता व्यक्त केली. सागरावर अवलंबून असणा-या कोळी बांधवांचा समुद्र हाच देव आहे. वाजत गाजत आणि नाचत जाऊन त्यांनी सागराची पूजा केली आणि त्याला नारळ अर्पण केला. खवळलेल्या समुद्रानं शांत व्हावं आणि आपला व्यापार उदीम भरभराटीस यावा अशी प्रार्थना त्यांनी यावेळी केली. कळवा पूलावर आणि आसपासच्या परिसरात नारळी पौर्णिमेनिमित्त नारळ अर्पण करण्यासाठी कोळी बांधवांनी गर्दी केली होती. कोळी बांधव-भगिनी आपल्या पारंपरिक वेषात तर अनेक जण नविन वस्त्र परिधान करून नारळ अर्पण करण्यासाठी आले होते.