धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यामुळं पाणी कपातीची टांगती तलवार दूर झाल्यात जमा

शहराप्रमाणेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस होत असून या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली असून पाणी टंचाईही जवळपास दूर झाल्यात जमा आहे. ऑगस्टच्या सुरूवातीला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात फारसा पाऊस न झाल्यामुळं धरणांचा पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी होता. त्यामुळं पाणी टंचाईची टांगती तलवार होती. पण गेल्या काही दिवसात झालेल्या चांगल्या पावसामुळे धरणांच्या पाणीसाठ्यात चांगली वाढ झाली आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला भातसा आणि बारवी धरणातून पाणी पुरवठा केला जातो. भातसा धरणाची पाणी साठवण्याची क्षमता् ९४२ दशलक्ष घनमीटर असून आजघडीला ७७९ दशलक्ष घनमीटर म्हणजे जवळपास ८३ टक्के पाणीसाठा धरणात आहे. गेल्यावर्षी याच काळात जवळपास ९५ टक्के पाणीसाठा होता. तीच परिस्थिती बारवी धरणाची असून बारवी धरणाची पाणी साठवण्याची क्षमता ३३८ दशलक्ष घनमीटर असून सध्या धरणात २४६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच ७३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी याच काळात बारवी धरणात १०० टक्के पाणीसाठा होता. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा पाणीसाठा तेवढा नसला तरी पाणी टंचाई आणि पाणी कपातीची टांगती तलवार मात्र दूर झाल्यात जमा आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading