देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष असलेल्या काँग्रेसनं देशातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना जोडण्यासाठी शक्ती हे ॲप विकसित केलं आहे. या ॲपद्वारे राहुल गांधी यांचे संदेश पोहचवून कार्यकर्त्यांशी दैनंदिन संवाद साधला जात आहे असा दावा काँग्रेसचे महाराष्ट्राचे सहप्रभारी बी. एम. संदीप यांनी केला आहे. शहर काँग्रेसच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या एका सोहळ्यात बोलताना त्यांनी हा दावा केला. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची श्रेष्ठींकडून दखल घेतली जात नाही अशी ओरड असते. मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांशी जोडण्यासाठी राहुल गांधी यांच्या संकल्पनेतून शक्ती हे ॲप विकसित करण्यात आलं आहे. पूर्वीप्रमाणेच काँग्रेसची संघटना मजबूत करण्यासाठी पक्षातर्फे विविध कार्यक्रम राबवले जात असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रत्येक कार्यकर्त्याशी संवाद साधण्यासाठी शक्ती हे ॲप विकसित करण्यात आलं असून प्रत्येकानं हे ॲप डाऊनलोड करावे. काँग्रेसच्या प्रत्येक घडामोडीसह स्वत: राहुल गांधी यांच्याशी संदेशाद्वारे संवाद साधला जाणार आहे असं बी. एम. संदीप यांनी सांगितलं.