देशाच्या पंतप्रधानानी भारतीय सैन्य दलात सुरू केलेल्या सुविधांमुळे तरुण वर्गाला भरतीची मोठी संधी – आमदार संजय केळकर

भारतीय सैन्य दलात भरती होऊन लेफ्टनंट पदी निवड झालेल्या लेफ्टनंट स्वराज बने यांचा शौर्य डिफेन्स अकॅडमी आणि महाराष्ट्र युवा क्रिडा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गौरव करण्यात आला. आमदार संजय केळकर, मेजर प्रांजळ जाधव यांच्या हस्ते लेफ्टनंट स्वराज बने यांचा हा गौरव करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सैन्यात भरती होण्याकरिता विविध सुविधा उपलब्ध केल्यामुळे तरुण वर्गाला मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. सैन्यात अधिकारी बनण्याकरिता शौर्य अकॅडमी मार्फत भरती पूर्व परीक्षा घेऊन तसेच योग्य मार्गदर्शन केले जाते. तसेच महाराष्ट्र युवा क्रिडा प्रतिष्ठान मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडकील्यावर स्वच्छ्ता मोहीम मोठ्या प्रमाणात घेतली जात असून एक समाज हिताचे कार्य या संस्थांच्या माध्यमातून होत असल्याचे आमदार संजय केळकर यांनी सांगून तरुण वर्गाला सैन्य भरतीत अधिकारी बनण्याकरिता शिक्षणावर जास्त लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला केळकरांनी दिला.
राज्यातील गडकिल्ल्यांची स्वच्छ्ता आणि गडाची रक्षा करणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे, किल्ल्यावर ट्रेकिंगचे आयोजन मागील कित्येक वर्षा पासून करत असून ट्रेकिंग मुळे आरोग्य फिट राहत असून महाराष्ट्र युवा क्रिडा प्रतिष्ठान मार्फत सैन्यात भरती होणाऱ्या युवक, युवतींना ट्रेकिंग बद्दल काही माहिती किंवा प्रत्यक्ष ट्रेकिंग करायची असेल तर योग्य ते मार्गदर्शन केले जाईल असे महाराष्ट्र युवा क्रीडा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अमोल कदम यांनी सांगितले.
देशाचे राष्ट्रगीत डिफेन्स कार्यक्रमामध्ये स्पिकरवर न लावता प्रत्यक्ष प्रत्येक नागरिकांनी मोठ्या आवाजात बोलून आपल्या देशाच्या राष्ट्रगीताचा प्रत्येकाला अभिमान असल्याचे मेजर प्रांजळ जाधव यांनी सांगितले. तसेच सैन्यात भरती होण्याकरिता डीसीप्लिन काय असते याची माहिती देऊन पुढील कार्यकाळात मोठ्या अधिकाऱ्यांपर्यंत कशी अभ्यासातून यश संपादन करण्यात येईल असे मेजर जाधव यांनी सांगितले.
लेफ्टनंट स्वराज बनेच्या जीवनावर प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुवर्णा भोईर यांनी “स्वराज” ही कविता सादर केली.
लेफ्टनंट स्वराज बने खूप खडतर जीवन प्रवासामधून अभ्यास करत कठीण परिश्रमातून त्याने आपली सैन्य दलात भरती होण्याची जिद्द न सोडून अखेर तो सैन्य दलात भरती होऊन लेफ्टनंट पदावर त्याची निवड झाल्याने शौर्य डिफेन्स अकॅडमीच्या संस्थापिका वैशाली म्हत्रे यांनी खूप कौतुक केले.
सैन्य दलात भरती झाल्यानंतर आपल्या रेजिमेंट सोबत कसे राहायचे तसेच अजून पुढील कार्यकाळात अजून अभ्यास करून अजून मोठ्या पदापर्यंत कशी मजल मारायची असा गोड सल्ला मेजर सुभाष गावंड यांनी कार्यक्रम प्रसंगी दिला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading