दिवा आणि मुंब्रा परिसराला आज संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जलवाहिनी काटई नाका येथे फुटल्या मुळे हा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
डोंबिवलीतील ते देसाईगाव येथे आज सकाळी साडेदहाच्या सुमारास ही जलवाहिनी फुटली आहे. ही जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाहून गेले आहे. जलवाहिनी फुटल्यामुळे देसाईगावात
गावात पाणीच पाणी झालं होतं. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने या जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतल असून पाणीपुरवठा पूर्ववत होईल काही काळ लागणार आहे. यामुळे मुंब्रा
आणि दिव्यामध्ये संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा होणार नाही.