ढोलताशांच्या गजरात गौरी गणपतींना निरोप देण्यात आला. यावेळी जोरदार पाऊस लागल्यामुळे गणेश भक्तांचा काहीसा विरस झाला. ठाणे पोलीस आयुक्तालयात ८५ सार्वजनिक, ३६ हजाराहून अधिक खाजगी गणपतींचं तर जवळपास १६ हजार गौरींचं विसर्जन झालं. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हांला अशा जयघोषात गणरायांना निरोप दिला जात होता. गणेशोत्सवादरम्यान वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून ठाण्यातील वाहतुकीचं नियमन करण्यात आलं होतं.