डोंबिवली स्वागत यात्रेत यंदा प्रथमच सांस्कृतीक पथाचं आयोजन करण्यात आले आहे. यंदा स्वागत यात्रेचे २५ वे वर्ष म्हणजेच रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे यंदाची स्वागत यात्रा मोठ्या उत्साहात निघणार आहे. या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त यंदा सांस्कृतीक पथाचं कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आल होत. देशाचे संस्कृती पारंपारिकता आणि नाविन्यता नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने हा उपक्रम गणेश मंदिर संस्थान तर्फे राबविण्यात आला. पर्यावरणाचा विषय घेऊन पंचमहाभुतांच्या दिंडीने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. तरुण तरुणांनी या दिंडीमध्ये पारंपारिक वेशभूषा करत सहभाग घेतला होता. लोकवाद्यांच सादरीकरण यावेळी करण्यात आलं. तसेच पर्यटनाच्या स्थळांवर सेल्फी पॉईंटही उभारण्यात आले होते.