डोंबिवलीत झालेल्या दुर्दैवी घटनेची चौकशी जलदगती न्यायालयात केली जाईल असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. डोंबिवलीतील घटना दुर्दैवी असून याबाबतचा दावा जलदगतीने चालवला जाईल. डोंबिवली येथे अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना अत्यंत दुर्दैवी आणि काळीमा फासणारी आहे. या घटनेतील २७ ते २८ संशयितांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी जे दोषी असतील त्यांना सोडले जाणार नाही. हा दावा जलदगतीने चालविण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. डोंबिवली सारखी घटना पुन्हा होऊ नये यासाठी कडक पावले उचलण्यात येत आहेत, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.