ठाण्यामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांनी बंद पाळल्यामुळं ३१ मार्च पर्यंत वृत्तपत्रं वाचावयास मिळणार नाहीत. यामुळं ठाणेकर सकाळी सकाळी मिळणा-या बौध्दीक खुराकापासून वंचित राहणार आहेत. मुंबईमध्ये ज्याप्रकारे कोरोना रुग्ण वाढत आहेत या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे येथील सर्व वृत्तपत्र विक्रेते आपला व्यवसाय 31 मार्चपर्यंत बंद ठेवणार आहेत. लोकांच्या आणि विक्रेत्यांच्या आरोग्याची दक्षता म्हणून आजपासून 31 मार्चपर्यंत वृत्तपत्र वाटप बंद करण्यात आलं आहे.