ठाण्यामध्ये गेल्या चोवीस तासात 81 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेले काही दिवस ठाण्यामध्ये पावसा ना जोरदार हजेरी लावली आहे. मात्र आज सकाळपासून पावसाने विश्रांती घेतल्यास दिसत आहे. सकाळपासून अगदी तुरळक सरी पावसाच्या पडल्या पावसाने विश्रांती घेतल्यामुळे सर्वसामान्य माणसालाही थोडसं हायसं वाटलं आहे. शहराप्रमाणेच जिल्ह्यातही विशेषता धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस होत आहे. ठाणेआणि आजूबाजूच्या परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा धरणातील पाणीसाठा तरी चांगलीच वाढ झाली आहे. धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 133 मीटर असून सध्या धरणांमध्ये 114 मीटर पर्यंत पाणी साठा आहे, म्हणजे धरणांमध्ये एकूण पाणी क्षमतेच्या 75% साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात हा पाण्याचा साठा 37 टक्के होता, त्यामुळे यंदा धरणाच्या पाणीसाठ्यात चांगलीच वाढ झाल्याचे दिसत आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतराशे मिलिमीटर हून अधिक पाऊस झाला असून हा पाऊस आहे गेल्या वर्षीच्या तिप्पट आहे.