ठाण्यामध्ये काल श्रावणीचं आयोजन करण्यात आलं होतं.
श्रावण शुध्द पंचमी नागपंचमी, कल्की जयंती आणि हस्त नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर नेहमीच्या प्रथेप्रमाणे ब्राह्मण सभेत कोरोनाच्या सर्व नियंमाचे पालन करून श्रावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथमच या कार्यक्रमास ब्रह्मवृंदांचा मोठा प्रतिसाद लाभला. मुख्य म्हणजे 12 वर्षापेक्षा कमी वयाचे पांच विद्यार्थी या कार्यक्रमास पालकांसमवेत उपस्थित होते. वझे आणि गद्रे गुरुजी यांनी श्रावणी कार्यक्रमाचे पौरोहित्य उत्तम प्रकारे केले. ब्राह्मण सभेची विद्यमान कार्यकारिणी आणि पदाधिकारी यांचे कारकीर्तिद उत्तम नियोजन, प्रभावी समन्वय आणि संयोजन यामुळे हा कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला.