ठाणे जिल्हा परिषदेत अनुकंपा तत्वावर १३ कर्मचा-यांची भरती करण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारी जिल्हा परिषदेची अनुकंपा भरती प्रक्रीया यशस्वीपणे राबवून १३ पात्र अनुकंपाधारकांना जिल्हा परिषद अंतर्गत सरळसेवा कोट्यातील रिक्त पदांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशाने नियुक्ती देण्यात आली. सर्वांनी सचोटीने काम करून मिळालेल्या संधीचे सोने करावे अशी अपेक्षा यावेळी मान्यवरांनी व्यक्त केली. जिल्हा परिषदे अंतर्गत सरळसेवा कोट्यातील कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कंत्राटी ग्रामसेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, या पदांवर जेष्ठतेनुसार आणि शैक्षणिक अहर्तेनुसार तसंच त्या पदाकरीता आवश्यक अर्हता विचारात घेऊन 13 पात्र अनुकंपाधारकांना ही नियुक्ती देण्यात आली. यामध्ये विशाल कंटे, प्रतिभा पवार, प्रशांत वेखेंडे, सबा परवीन मुस्ताक शेख, किरण गोतरणे, सुधीर देशमुख, गौरव शिंदे, प्रशांत यशवंतराव, अमेय पाटील, लिलाकर चवरे, प्रथमेश भोई, माधुरी पाटोळे, दिनेश बागले आदी उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे