ठाण्यात पुन्हा लॉकडाऊन होणार या भीतीने काल नागरिकांनी बाजारपेठेत एकच गर्दी केली होती. ठाण्यात कोरोना रूग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत असून हॉटस्पॉट असलेल्या भागांमध्ये पुन्हा लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांनी काल बाजारात गर्दी केली होती. किराणा सामान, पावसाळी वस्तू खरेदीसाठी काल संध्याकाळी नागरिकांच्या रांगा लागल्याचं चित्र दिसत होतं. १ जूनपासून शासनानं अनलॉक १ सुरू केलं त्यानंतर दुकानं उघडण्याची मुभा देण्यात आली. पण या दरम्यान कोरोनाचा संसर्ग अधिक वाढला आणि त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची तयारी पालिकेनं केली आहे. त्यामुळे गावदेवी, जांभळी नाका मार्केटमधील दुकानांमध्ये पावसाळी साहित्य, भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.