ठाण्यात संध्याकाळी पावसानं हजेरी लावली. पावसानं हजेरी लावल्यामुळे हवेत सुखद गारवा अनुभवायला येत आहे. गेले काही दिवस तीव्र उष्म्यामुळे हैराण झालेल्या ठाणेकरांना या पावसानं चांगलाच दिलासा दिला आहे. वीजेच्या गडगडाटासह वीजेच्या चमचमाटात पावसानं चांगलीच हजेरी लावली. यंदा पाऊस लवकर येणार अशी चर्चा असताना पाऊल लांबल्यामुळे सर्वसामान्य माणूस हवालदिल झाला होता. रोज घामाच्या धारांनी हैराण झालेल्या सर्वसामान्य माणसाला आजच्या पावसानं चांगलाच दिलासा दिला आहे. पावसापूर्वी काही वेळ जोरदार वारा सुटला होता. या वा-यामुळे अनेकांच्या घरातील वस्तू पडल्या. पाऊस चांगलाच पडत असून त्यानं बराच वेळ हजेरी लावली होती. या पावसामुळे तीव्र उष्म्यानं हैराण झालेल्या ठाणेकरांना हवेतील सुखद गारवा हवाहवासा वाटत आहे.