ठाण्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे. जून महिना संपत आला तरी यंदा म्हणावा तसा पाऊस न झाल्यानं पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला सामोरं जावं लागणार अशी भीती निर्माण झाली होती. पण आता जून अखेरीला का होईना पावसाने हजेरी लावली आहे. काल रात्रीही पावसानं काही वेळ जोरदार हजेरी लावली होती. काल सकाळी साडेनऊ पासून आज पहाटे साडेचार पर्यंत ३७ मिलीमीटर पाऊस झाला तर आज सकाळपासून दुपारपर्यंत ३२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.