ठाण्यात आज वटपौर्णिमेचं व्रत स्त्रियांनी वडाची पूजा करून केलं साजरं

ठाण्यात आज वटपौर्णिमेचं व्रत अनेक स्त्रियांनी वडाची पूजा करून साजरं केलं. तर काही ठीकाणी मास्क लावुन वडाची पुजा करतानाही महिला दिसल्या. गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे वटपौर्णिमेचं व्रत घरी राहूनच स्त्रियांना करावं लागलं होतं. पण यंदा मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा केली. विशेषत: नवविवाहित महिला नटून थटून, नववारी साडी परिधान करून वटपौर्णिमेच्या पूजेला जाताना दिसत होत्या. विवाहित स्त्रिया पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावे यासाठी वटपौर्णिमेचं व्रत करतात. सर्व वृक्षांमध्ये वट वृक्षाचं आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विस्तारही खूप होतो. वडाला पर्यावरण शास्त्राच्या दृष्टीनेही विशेष महत्व आहे. त्यामुळे वटवृक्षाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही पूजा करण्याची प्रथा पडली असावी. सावित्रीनेही सत्यवानाचे प्राण वडाच्या झाडाखालीच परत मिळवले. म्हणूनच ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading